नवीन शैक्षणिक धोरणात कशा होतील परीक्षा ......!!
----------------------------------
🔰काही ठळक मुद्धे 🔰
---------------------------
🍁नवीन राष्ट्रीय धोरणानुसार मूल्यमापनाच्या उद्दिष्टात बदल करून ते अधिक नियमित व रचनात्मक केले जाईल.
🍁 नवीन मूल्यमापन हे विद्यार्थ्याचे कौशल्य तपासेल. ते मूल्यमापनाच्या क्षमतेवर आधारित असेल.
🍁 नवीन शैक्षणिक धोरणातील मूल्यमापनामधून विश्लेषण कौशल्य , तार्किक विचार व संकल्पना किती समजली हे तपासले जाईल .
🍁 परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्याय व त्यात निवड करण्याची लवचिकता असेल.
🍁 इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा आहेत तशाच असतील फक्त परीक्षेच्या पद्धती बदललेल्या असतील.
🍁 बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली जाईल. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन मिळेल.
🍁 महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आवडीनुसार बोर्डाच्या परीक्षेसाठी अनेक विषय निवडण्याची मुभा राहील.
🍁 या शैक्षणिक धोरणानुसार एका शालेय शैक्षणिक वर्षामध्ये दोनदा परीक्षेला ( बोर्डाच्या) बसता येईल. म्हणजे एक मुख्य परीक्षा व दुसरी त्यात सुधारणा करण्यासाठी ची परीक्षा. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तो पुन्हा परीक्षा देऊ शकेल.
🍁 शाळेतील शिक्षकांना दर्जेदार अध्यापन करणे ही महत्त्वाची अट असेल.
🍁 सध्या पहिली ते आठवीसाठी कोणतीही परीक्षा नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता तिसरी , इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी परीक्षा होईल.
🍁इयत्ता तिसरीच्या परीक्षा पायाभूत साक्षरता , संख्याज्ञान , पायाभूत कौशल्य यावर आधारित असतील.
🍁 या होणाऱ्या परीक्षा घोकंपट्टीवर आधारित नसतील.
🍁 प्रत्येक विषयाची अध्ययन निष्पत्ती ( लर्निंग आउटकम ) विकसित झाली आहे की नाही हे पाहणारी परीक्षा असेल.
🍁 नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्ती मुलांनी आत्मसाद केली की नाही याची पारख निश्चितपणे केली जाईल.
🍁 शालेय परीक्षांच्या निकालाचा वापर शालेय एकूणच व्यवस्थेच्या विकासासाठी केला जाईल. म्हणजेच एखाद्या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नसेल तर संदर्भित वर्गशिक्षकांना ' विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक का नाही ? ' असाही जाब शिक्षण विभागामार्फत विचारला जाऊ शकतो.
------------------------------------
No comments:
Post a Comment